Skip to main content

भावकी

🤔आमची भावकी चांगली आहे, म्हणणारे
    👻फार दुर्मिळ आहेत ,
🤔आमच्यासारखी भावकी कोणाचीच नाही,
   👻असे म्हणणारे खूप आहेत .

*खरेच आपल्याच रक्ताची माणसे एकमेकाशी*
👹एवढी विकृत का वागत असावीत⁉
हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे.
अनेक 👩‍🏫पिढ्या 🧟‍♀घरे , घराणी यात
भूईसपाट व बरबाद
झाल्याचा आपला इतिहास आहे .
👣शहाजीराजे 👣शिवराय 👣शंभूराय
यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत,
😣पुण्यातील पेशव्यांनी तर यात 👎🏾कळस गाठला आहे , *ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत*, थोडक्यात
🎙यातून कोणाचीच सुटका होत नाही , कारण
👎🏾तसा कोणी प्रयत्न केला तर *त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो* कारण
👎🏾भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार ,👹गर्व दडलेला असतो ,
👎🏾 त्याचा मद व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो.
🎙आज 🦂दिवाणी खटले, 🦂फौजदारी गुन्हे,
🦂शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या 👻भांडणाचा क्रमांक नेहमी पहीला आहे .
🤭उत्पन्नाचा किती भाग आज
    समाज यावर खर्च करतोय⁉
🤭 अल्प असलेल्या आयुष्यात
   किती वेळ सत्कारणी लागतोय⁉ आणि
🤭पुढच्या पिढीला आपण काय देतोय⁉
🤔हे प्रश्न जरी स्वतःला आपण दररोज विचारले
✊तरी आपल्यात बदल होऊ शकतो आणि
✊हेच आपल्या हातात आहे .
⚔🤪 भावकीला बदलवणे🤪⚔
❌पेशव्यांना जमले नाही ,
❌ आपल्यालाही ते जमणार नाही .
🙏🎓बदल स्वतःत केला पाहीजे🎓🙏
☺धाकटे असाल तर
    *सहन करायला शिका* आणि
☺थोरले असाल तर
    *माफ करायला शिका*
🎙👻भावकीशी बोलताना👻🎙
❌शक्यतो प्रतीहल्ला टाळा ,
❌ त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया टाळा ,
❌त्यांनी खोडी काढली तर प्रतिशोध टाळा ,
❌सर्वात महत्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि
✊ दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर 💪🏾ऐकून घेऊ नका आणि 💪🏾सहनही करू नका .
*त्यांनी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका*,
*भावकीच्या यशाचे मन आणि तोंडभरून खरे कौतुक करायची सवय लावून घ्या*,
*अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतःहोऊन पुढे करा*, कारण
भावकी मेली तरी 👻भावकीच्या पुढे मदतीसाठी हात पसरत नाही , ✊ *तो हात आपण समोर केला तर त्याच्यासारखे दुसरे समाधान नाही*.
🤔हे सर्व खूप अवघड आहे , पण
*आजच्या काळात खूप गरजेचे आहे* , कारण
*आपण सर्वजण खूप अडचणीत आणि संकटात आहोत* .
🤭या क्रियेने एकवेळ भावकीची साथ नाही मिळाली तरी चालेल , पण
😣भावकीचा त्रास वाचला तरी हे थोडे नाही , कारण *आयुष्यातील निम्मी शक्ती , संपत्ती आणि बहूमुल्य वेळ आपला यातच वाया चालला आहे*.
सुधारायचे असेल तर ही शक्ती , संपत्ती आणि वेळ *सत्कारणी लावता आला पाहीजे*.
😣भावकीच्या भांडणात देवही हरला आहे , तो जिंकला असता तर महाभारत घडलेच नसते ,
🕉⛳ भावकीतील वाद संपवणे
    हे देवापेक्षा मोठे काम आहे , त्यासाठी
✊आपण प्रयत्न करावेत म्हणूनच *आमच्या पूर्वजांनी , संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तिन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे* ,
🧟‍♂🙏🧟‍♀कितीही भांडा🧟‍♀🙏🧟‍♂
प्रत्येकाचा 👻शेवटचा प्रवास हा
भावकीच्या खांद्यावरच होणार आहे .
*बघा काय सुधरायला जमतेय का*⁉

      🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
     ⚔✍ ✍⚔

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...