🙏Nice🙏
पूर्वीचा काळ बाबा,
खरंच होता चांगला,
साधे घरं साधी माणसं,
कुठे होता बंगला ?
घरं जरी साधेच पण,
माणसं होती मायाळू,
साधी राहणी चटणी भाकरी,
देवभोळी अन श्रद्धाळू.
सख्खे काय चुलत काय,
सगळेच आपले वाटायचे,
सुख असो दुःख असो,
आपुलकीने भेटायचे.
एखाध्याच्या घरात कार्यक्रम
असला कि सर्व भावकी
दोन दिवसापासुनचं झटायला यायची
पाहुणा दारात दिसला की,
खूपच आनंद व्हायचा हो,त्याला गुळाचा खडा
आणि तांब्याबर पाणी द्यायची
नि बसायला घोंगडी टाकायची
हसून खेळून गप्पा मारून,
शीण निघून जायचा हो.
श्रीमंती जरी नसली तरी,
एकट कधी वाटलं नाही,
खिसे फाटके असले तरीही,
कोणतंच काम रुकलं नाही.
उसनं पासनं करायचे पण,
पोटभर खाऊ घालायचे,ह्याच्या घरातील वाटीबर कालवल त्या घरात जायचं तिकडल वाटीबर कालवण हिकड यायच दिलेल्या भांड्यात प्रेमचं जास्त जायचं
पैसे आडके नव्हते तरीही,
मन मोकळं बोलायचे.
कणकेच्या उपम्या सोबत,
गुळाचा शिरा असायचा,
पत्रावळ जरी असली तरी,
माणस पोटबर जेवुन ढेकरं घायची
लपाछपी पळापळी, सुरपांरब्या,इंटी टाडू,लगोर हे सर्व
बिन पैशाचे खेळ हो,
त्यावेळी कुणीच कुठे busy नव्हते,
होता वेळच वेळ हो.
चिरेबंदी वाडे सुद्धा,
खळखळून हसायचे,
निवांत गप्पा मारीत माणसं,
ओसरीवर रेडिओ ऐकत बसायची
आख्या जगाची खबर त्यावेळी रेडिओवर कळायची
सुख शांती समाधान " ते "
आता कुठे दिसते का ?
पॉश पॉश घरा मधे,
" तशी " मैफिल सजते का ?मोबाईलच्या जमान्यात आम्ही सर्व विसरुन बसलो आहे आज कुणालाच कुणासाठी वेळ नाही प्रेमाचा झरा आटत चालला आहे
त्याकाळी नाते गोते घट्ट होते,
किंमत होती माणसाला,
प्रेमामुळे चव होती,
अंगणातल्या फणसाला.
तुम्हीच सांगा नात्यामध्ये,
राहिला आहे का राम ?
सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,
कुणीच कुणाला बोलत नाही,
मृदंगाच्या ताला वरती,
गाव आता का डोलत नाही.
प्रेम , माया , आपुलकी हे,
शब्द आम्हाला घावतील का ?
बैठकीतल्या सतरंजीवर,
पुन्हा पाहुणे मावतील का ?
आयुष्य क्षणभर आहे त्या आयुष्यांचा उपभोग घ्या घरातील जुन्या माणसांना किमत द्या पैसा आला म्हणुन त्यांना विसरू नका
ज्यांनी आपल्याला त्यांच्या अंगा खादयांवर वागवले त्यांना म्हातरपणी तुम्ही निट सांभाळा !!!
Comments
Post a Comment