Skip to main content

#तो संसार कसला....

संसार तसा चार शब्दांत मांडता येतो,
ओळख,लग्न,मधुचंद्र आणि नंतर जे काही उरतं ती टेस्ट क्रिकेट मॅच.
पहिले तीन शब्द "वन डे क्रिकेट" सारखे खेळले जातात,
रिझल्ट पटकन हातात येतो.....
... जोडप्यातले दोघे आपापल्या राग,दोष,क्रोध,हर्ष,व्यसन खेळांडून समावेत ह्या मॅच खेळायला मैदानात उतरतात.
"ओळख" हा सामना सर्वात महत्वाचा...
ओळख झाली ती चुकीच्या व्यक्तीशी झाली कि पुढचे सगळे सामने खेळण्या आधीच हरल्यासारखे असतं,
आणि
तीच ओळख योग्य व्यक्तीशी झाली कि खेळाचे मैदान पण नंदनवन ठरतं.
आणि अशा नंदनवनात सगळ्या सामन्यात समोरच्याचे जिंकणच आपला जिंकणं असतं...
शेवटची टेस्ट क्रिकेट मॅच खूप वेळ खेळली जाते...बहुतेकदा रटाळवाणी असते...
पण तरीही हि दोन्ही साथीदारांनी खेळावीच....
आयुष्याच्या शेवटी म्हातारपणात जोडीदारांनी संपूर्ण "स्कोअर बोर्ड" एकत्र बसून पहावा....
आणि
सामना कुणीही जिंकले असले तरी मिळालेली "ट्रॉफी" दोघांची आहे असे समजून
"एक यशस्वी संसार" असा दोघांनी सही केलेला चेक डोळे भरून पहावा...
आणि तो चेक पाहताना...
आयुष्याच्या शेवटी जगलेला संसार आठवून डोळ्यांत सुखाचे पाणी नाही आले तर तो संसार कसला.....

Comments

Popular posts from this blog

#वृक्ष माझा सखा...

वृक्षांच्या सांनिध्यात रहायला कुणाला आवडत नाहीं ? वृक्षांच आपल्या जीवनातील महत्व खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही. पण हवेचं शुद्धिकरण, पावसांच मान, जमिनीची धूप रोखण, प्र...

#हृदयस्पर्शी किस्सा "

रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- *एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा "* - "नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढ...

#आपटा पानांचा औषधी उपयोग....

*आपटा पानांचा औषधी उपयोग * लठ्ठपणा, व्हेरीकोज व्हेन्स, व्हर्टीगो,फुफ्फुसात पाणी होणे, पडजीभेचा त्रास, हार्ट मधे टोचणे, हार्ट अकुंचन पावणे, हार्टमधे दूखणे, हार्टचा व्हाॅल् ...